Share

‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अखेर अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. केंद्र -राज्य सरकार व सिडकोची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला.

या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केले आहे. व्यवस्थापन कोणाचेही असो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवाज हा मराठी माणसाचाच असेल असे सांगितले आहे.

‘मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या’ असा इशारा मनसे नेते सरदेसाई यांनी दिला आहे. दरम्यान, मनसेने मराठीचा मुद्दा दूर सारत आता हिंदूत्त्वाचा नारा दिलेला आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या झेंड्यातही बदल करण्यात आलेला आहे. पण आता नितीन सरदेसाई यांनी विमानतळ व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून ‘आवाज’ हा मराठीच असल्याचे सांगितल्याने पक्षाची भूमिका कोणत्या दिशेला जात आहे याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!