🕒 1 min read
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. राज्यभरात काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध केला होता. आता याच मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘२०१४ ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने पेट्रोल-डिझेलचा मुद्दा समोर करून ‘अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरातबाजी केली. परंतू सत्तेत आल्यानंतर भाजप सातत्याने भाववाढ करत आहे. महत्त्वाची बाब आंतरराष्ट्रीय भाववाढ कमी आहे तरीदेखील देशात भाववाढ कायम आहे’ असा आरोप मलिक यांनी केलाय.
सध्या केवळ सरकारी तिजोरी भरण्याचं काम सुरू आहे. दरवर्षी ४ लाख कोटी रुपये हे सरकार लोकांच्या खिशातुन काढत आहे. बोलायचे एक आणि करायचे एक असे काम मोदी सरकार करत आहे. गॅस दरवाढ, डिझेल दरवाढ थांबायचं नाव घेत नाही. सीएनजीची देखील दरवाढ देखील सुरुच आहे. लोकांच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे त्यांचा खिसा कापण्याचं काम मोदी सरकार करत आहे. महागाईमुळे लोकांचे बजेट हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस देखील आंदोलने करत असल्याचे मलिक यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
