रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे. या यात्रेमध्ये राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे.
दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही,’ असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
‘आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे,’ असं विधान करत त्यांनी सूचक इशारा दिला असून हा इशारा नेमका कोणाला आहे यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही’; राणेंचा इशारा
- ‘मुघलांनी राष्ट्र निर्माण केलं म्हणणाऱ्या कबीर खान याचं डोकं ठिकाणावर आहे का ?’
- ‘राणेंच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उध्दवजींच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे’
- ‘माझा घसा ठिक होऊ दे, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार’, राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

