Share

कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, आता सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजपनेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या कारवाई वर शंका उपस्थित केली आहे. ‘कुछ तो गडबड है… मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय.आर वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है’. असं ट्विट करत सीबीआय कारवाईर शंका उपस्थित केली आहे.

राऊतांच्या या शंकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा आहे. १०० कोटींच्या घपल्याचा खरा सूत्रधार जनतेसमोर येईलच थोडी कळ काढा.’ असा प्रहार भातखळकर यांनी केला आहे. तसेच, ‘हायकोर्टाने अनिल देशमुख प्रकरणात दिलेल्या निकालात मुद्दा क्रमांक ८४ मध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की प्राथमिक चौकशी नंतर योग्य ती कारवाई करण्याचे CBI ला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ‘ असं संजय राऊत यांच्या लक्षात आणून दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!