नवी दिल्ली : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार राजकारण सुरु आहे. नुकतीच या प्रकरणात एका माहिती अधिकारातून एक नवीनच माहिती समोर आली होती. सोमेश कोलगे यांनी माहिती अधिकाऱ्यातून याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर प्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सध्य:स्थितीत माहिती उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याचं उत्तर देण्यात आलंय.
त्यानंतर आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे.
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त असलेल्या बारा जागांचा रितसर ठराव केला आहे. यासाठी राज्यपाल कोश्यारी यांची भेटही घेतली आहे. पण अद्याप राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या 12 जागांवरील लवकरात लवकर नियुक्ती व्हावी, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे राज्यातील ठाकरे सरकारनं केली आहे. राज्य सरकारनं मोदी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींमुळे ‘त्या’ एकरकमी चेकचे ७ हजार कोटी वाचले; आता ठाकरेंनी गरजूंसाठी आर्थिक पॅकेज द्यावे’
- सकारात्मक! उस्मानाबाद जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ
- ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार भारताचा जावई, पहा कोण आहे ‘नवरी’
- मोदी मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त
- ‘शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

