Share

‘शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी’, भाजपची मागणी

Published On: 

बीड: समाधानकारक पाऊस असूनही शेतकरी बांधव कोरोनाच्या आर्थिक संकटात होरपळला. त्यामुळे खते, बी-बियाणे, औषधी व इतर खरेदी करताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट अथवा फसवणूक होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

सध्याचा काळ हा महागाईचा झाला असून यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे त्यात शेती व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यावर आधीच नैसर्गिक संकट असतेच त्यात आता खतांच्या देखील किंमती वाढल्या असल्यामुळे त्यांच्यावर देखील आर्थिक संकट ओढावले आहे. गतवर्षापासून दुष्काळाचे सावट सरले असले तरी कोरोना महामारीने जीवनमान बाधित केले आहे.

खरीप हंगाम सुरू झाला असून खत, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करू लागला आहे. बोगस बियाणे अवाजवी भाव घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. मशागतीचा खर्च वाढला. अवकाळी वारा, पाऊस, गारा या संकटात सामना करताना शेतकऱ्यांचे नुकसान होते. तरीही न डगमगता चिकाटीने शेतकरी बांधव कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी धडपडत असतो. राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकणाऱ्या शेतकऱ्यांना रास्त भावात व दर्जात्मक खत, बी-बियाणे, कीटकनाशके मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांची कंपन्या व विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी मस्के यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!