उस्मानाबाद: कोरोनाची दुसरी लाट आणि त्यात वाढती रुग्ण संख्या यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता काही प्रमाणात ही वाढती रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्याचमुळे आता जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे बरे होऊन घरी जाणारी संख्याही समाधानकारक असून, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अवघी १४७० उरली आहे. जिल्ह्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९५.०८ टक्के झाले आहे. नव्या रुग्णांमध्ये वाढ न झाल्यास आठवड्यात जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या बोटावर मोजण्याएवढीच शिल्लक राहु शकते, अशी आशा आहे. सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात १४२ नव्या रूग्णांची भर पडली असून, मागील काही दिवसांतील ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र सोमवारी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये.
कोरोनाची लाट ओसरत असून, उपचाराखालील रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढल्याचे अहवालातून समोर आले. ९४ टक्क्याच्या आत असलेला रिकव्हरी रेट सोमवारी ९५ टक्क्यांच्या वर गेल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात १४२ नवे रुग्ण आढळले. त्यात उस्मानाबाद तालुक्यात ३४, तुळजापूरमध्ये २३,उमरगा ११, लोहारा १८, कळंब १७, वाशी १५,भूम ९ व परंडा तालुक्यात १५ रूग्णांचा समावेश आहे. मागील काही दिवसांत ६ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, त्याची नोंद सोमवारी घेण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त
- उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल
- ‘आम्ही आकडे लपवलेले नाहीत,मात्र जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे’
- संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
- महापौरांचा 100% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई – आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

