Share

मृग नक्षत्राने फिरवली पाठ; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत

Published On: 

औरंगाबाद : यंदा वेळेवर मान्सुनचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने सांगतिले असल्याने कधी नव्हे तो बळीराजाच्या बी-बियाणे खरेदीसाठी लगबग करु लागले. यंदा खरीप अगदी वेळेवर सुरू होणार या आशेने बळीराजा दुप्पट जोमाने कामाला जुंपला आहे. मात्र ज्या नक्षत्रावर सर्वात जास्त भरवसा असतो त्या मृग नक्षत्रानेच पाठ फिरविल्याने आता खरीप हंगाम पुन्हा एकदा लांबणार का, अशी भिती शेतक-यांना वाटत आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. पैठण तालुक्यातील मोजक्याच भागात थोड्याफार प्रमाणात मान्सूनपुर्व पाऊस झाला. काही भागात मात्र पेरणी योग्य पाऊस झालाच नाही. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. या काळात धो धो पाऊस पडून मातीचा सुगंध आसमंतात दरवळतो आणि बळीराजा खरिपाच्या पेरणीला सज्ज होत असतो. मात्र यंदा असे घडलेच नाही.

मृग संपत आला तरी पाऊस आलाच नाही. मागील आठवड्यात पाऊस येईल अशी शक्यता होती. मात्र ती फोल ठरली. या आठवड्यात तर पुन्हा एकदा उकाडा सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरात कपाशी, बाजरी, तूर, मका, कांदा, मूग आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही परिसरात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते असा शेतकNयांना विश्वास असतो. मात्र आता जुनचा तिसरा आठवडा सुरू झाला तरीही लागवड झाली नसल्याने कपाशी बरोबरच लाल कांदा, तूर आदी पिकांची पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!