Share

पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरून पृथ्वीराज चव्हाण यांना संशय, म्हणाले..

Published On: 

मुंबई : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगलामध्ये एकूण आठ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडेल. तर आठ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर २ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणूक कार्यक्रमांवर काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

चव्हाण म्हणतात की, केरळमध्ये १४० जागा, तामिळनाडूत २३४, पुडुचेरीच्या ३० जागा अशा एकूण ४०४ जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, आसाम १२६ आणि पश्चिम बंगाल २९४ अशा ४२० जागांसाठी सात ते आठ टप्प्यात का मतदान घेतले जाणार आहे? यामागे काही वेगळी योजना तर नाही ना असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!