जालना : राजस्थानमधील जयपूर येथे नुकतीच ग्लमोन मिस इंडिया स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जालना शहरातील दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. यामुळे पोलीस दलाची मान आणखीन उंचावली आहे.
पोलीस उपनिरीक्षकाची मोठी जबाबदारी सांभाळत छंद जोपासणे तसे सोपे काम नाहीये. पण हे काम करून दाखवले ते जालन्यातील पोलीस अधिकारी पल्लवी जाधव यांनी. कामाचा व्याप, आपली जबाबदारी उत्कृष्टपणे निभावत पल्लवी यांनी आपला छंद जोपासला आहे. तो छंद काम केले नाही तर त्याला यशात रुपांतरीत केले आहे. राजस्थान येथील जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लमोन मिस इंडिया’ स्पर्धेत उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पल्लवी जाधव यांचा जीवनप्रवास तसा संघर्षमय राहिला आहे. हातात कोयता धरून ऊस तोडणाऱ्या, रोजगार हमी योजनेच्या कामात कामावर खड्डे खोदणाऱ्या आणि मिळेल ते काम करणाऱ्या कुटुंबाने रक्ताचे पाणी करून त्यांना शिक्षण दिले. २० मे २०१५ रोजी पल्लवी यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. ऑक्टोबर २०१५ नंतर एक वर्ष प्रशिक्षण घेऊन एमए मानसशास्त्र या विषयात देखील पारंगत असलेल्या पल्लवी यांनी विधिज्ञ म्हणूनही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- आश्चर्यम! बीड जिल्ह्यात भाजपच्या मदतीला धावली शिवसेना
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- ‘जयदत्त क्षीरसागरांनी धनजंय मुडेंवर टीका करू नये, अन्यथा..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
