Share

राज्यात ३ ते ४ दिवसात ‘रेमडेसिवीर’चा पुरवठा सुरळीत होणार– डॉ. राजेंद्र शिंगणे

Published On: 

मुंबई : राज्यात पुढील ३ ते ४ दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. केंद्र सरकारच्या वतीने निर्यात बंदी केल्यामुळे राज्याला इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही नवीन कंपन्यांनाही सरकारने मान्यता दिली असून त्या दृष्ट्रीकोणातून पुढील ३ ते ४ दिवसांत पुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच भाजपच्या वतीने एका कंपनीसोबत इंजेक्शन मागवण्याची बोलणी सुरू असतानाच पोलिसांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. या सर्वात राज्यातील राजकीय मंडळींचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या आरोप-प्रत्यारोपानंतही राज्यातील औषधांचा पुरवठा मात्र, अद्याप सुरळीत झालेला नव्हता.

आता मात्र, अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे स्वत: पुढे आले असून येत्या काही दिवसातच हा पुरवठा सुरळीत होवून सर्वांना मागणीनुसार औषधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही हॉस्पिटल विनाकारण अतिरीक्त रेमडेसिवीरचा वापर करत असून अशा हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!