Share

धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू

Published On: 

धुळे : राज्यात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या नऊ महिन्यांत १०२ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच दीड हजारापेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. दुसरीकडे सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेने केला आहे.

महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ५० पत्रकारांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. फेब्रुवारीनंतर दुसऱ्या लाटेत बाधित पत्रकारांची संख्या तर वाढलीच. परंतु मृत्यूचेही प्रमाणही वाढले. फेब्रुवारी ते एप्रिल या दोन महिन्यात तब्बल ५६ पत्रकारांचा मृत्यू झाला. तसेच दोन पत्रकारांनी आत्महत्या केली तर एकाची हत्या झाली. पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांमध्ये ५५ ते ६० वर्षे वयोगटातील पत्रकार होते.

दुसऱ्या लाटेत तरुण पत्रकारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पत्रकारांचे लसीकरण करावे, या मागणीसाठी पत्रकार परिषदेतर्फे ई-मेल पाठवा आंदोलन झाले. पण राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. कोरोना काळात अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. औषध उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यातून दोन पत्रकारांनी आत्महत्या केली. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा झाली. पण ती देखील मदत मिळाली नसल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!