नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटने त्यांचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. सरकारने लसींचा साठा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) दिशानिर्देश लक्षात न घेता अनेक वयोगटांतील लोकांचे लसीकरण सुरू केल्याचे जाधव म्हणाले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवले आहे.
त्यात म्हटले आहे की, जाधव यांचे वक्तव्य कंपनीची अधिकृत भूमिका नाही. मंत्रालयाचे नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांना सीरमच्या वतीने २२ मे रोजी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, जाधव यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे. हे कंपनीचे म्हणणे नाही. कंपनीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच सीरमने एक पत्रकही काढले आहे. त्यात म्हटले आहे की, सीरम कोविशील्डच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी वचनबद्ध आहे.
काय म्हणाले होते सुरेश जाधव?
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लशीबाबतच्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. केंद्र सरकारने लशीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, असे जाधव यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- मराठा आरक्षणाअभावी शिक्षणाची संधी हुकली; धुळ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

