🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. यामुळेच भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
मंदिर उघडावीत या मागणीसाठी भाजपा आता आक्रमक झाली आहेत. ठिकठिकाणी भाजप नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन केलं आहे. सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार, हॉटेल, मॉल सुरू केले मग मंदिर बंद का असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. तर या आंदोलनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे.
‘राज्यात सत्ता नसल्याने भाजप हा कासावीस झाला आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काहीही प्रयत्न करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी तर १५ ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचे काही देणंघेण नाही’, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थावर ईडीची धाड
- ‘मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानींकडून खरेदी’, बाळासाहेब थोरातांचा घणाघात
- ‘गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू’, राष्ट्रवादीचा आरोप
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘योग्य वेळी सीडी लावणार, सध्या ती पोलिसांकडे’, खडसेंचा इशारा

