मुंबई: पंजाबचे ‘पायउतार’ मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांनी आता नव्या पक्षाची घोषणा केली आहे. कॅ. अमरिंदर कालपर्यंत काँग्रेस पक्षाचे पंजाबातील महत्त्वाचे शिलेदार होते. अनेक वर्षे ते काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा लाभ घेत आहेत. भोगी व ऐयाशी अशी त्यांची प्रतिमा असतानाही काँग्रेसने त्यांना अनेक वर्षे सांभाळले. काँग्रेस पक्षातच त्यांच्या विरोधात नाराजी झाली, आमदारांत बंड झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षात एकही आमदार त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. कॅ. अमरिंदर पदावरून जातील तेवढे बरे, असेच प्रत्येकाला वाटत होते व अखेर ‘पतियाळा महाराज’ म्हणजे कॅ. अमरिंदर यांचा राजीनामा राहुल गांधींनी घेतला. यात त्यांचा असा काय अपमान झाला? पण आपला अपमान झाला असे म्हणत त्यांनी जो भांगडा सुरू केला, त्या भांगडय़ामागचे ढोलवादक अर्थात भारतीय जनता पक्षाचे कलाकार होते हे आता स्पष्ट झाले.असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे.
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे कॅ.अमरिंदर यांना ‘ चावी ‘ मारून भाजपमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे राजकारण त्यांच्यावर उलटेलच , पण सीमेवरचे आणखी एक राज्य ते अकारण तणावग्रस्त करतील . पंजाबचा असा गोंधळात गोंधळ करणे देशासाठी धोकादायक ठरेल . कॅ . अमरिंदर यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करायला लावून काँग्रेसच्या मतांचे विभाजन करायचे व आपली पोळी भाजायची हा भाजपचा डाव आहे . त्यांना कॅ . अमरिंदरविषयी ममत्व असण्याचे कारण नाही . पंजाब निवडणूक संपल्यावर कोण अमरिंदर आणि काय ते शेतकऱ्यांचे प्रश्न ? कॅ . अमरिंदर यांच्या पत्नी व मुलगाही काँगेस सोडायला तयार नाहीत असे वातावरण आहे.पंजाबची लढाई मोठी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कॅ.अमरिंदर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली व शेतकऱ्यांचे वगैरे प्रश्न सोडवले तर आपला पक्ष भाजपबरोबर युती करील, असे त्यांनी सांगितले आहे. हा गमतीचाच भाग आहे. पंजाबचे मुख्यमंत्री होते तेव्हा हे महाशय शेतकऱ्यांच्या प्रश्नी ठाम भूमिका घेऊन उभे राहिलेले कधी दिसले नाहीत. हे महाशय आपल्या फार्म हाऊसमध्येच स्वतःला कोंडून घेत. तेथे आमदार, मंत्री, अधिकाऱ्यांना येण्यासाठी मज्जाव होता. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्यच नव्हते. आता त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे व त्यासाठी ते भाजपशी हातमिळवणी करायला तयार झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- वंचित, दुर्लक्षित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे ‘मुप्टा’
- हिवाळी अधिवेशनात आमदारांसह प्रत्येकाला डोस नंतरही ‘आरटीपीसीआर’ टेस्ट सक्तीची
- ‘माझे पूर्ण ह्रदय एकाच फ्रेममध्ये..’म्हणत अनुष्काने केला विराटचा’तो’फोटो शेअर
- ‘मोदींच्या स्मार्ट सिटी, अमृत योजनांच्या अमिषाने शहरांची अधोगती झाली’, खा.वंदना चव्हाण यांचा आरोप
- गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
