🕒 1 min read
मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. आता यावरच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आघाडी सरकारची भूमिका, “मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव” (एसटी कर्मचारी हे देवच आहेत) असे खोचक ट्वीट प्रसाद लाड यांनी केले आहे. या ट्वीट मधून आंदोलक एसटी कर्मचारी यांच्याबाबत त्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत
आघाडी सरकारची भूमिका,
"मनी नाही भाव,
म्हणे देवा मला पाव!"(एसटी कर्मचारी हे देवचं आहेत!)@CMOMaharashtra @BJP4Maharashtra
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 12, 2021
दरम्यान मागील चार दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर हे सुद्धा सहभागी झाले असून दोन दिवसांपासून ते तीथेच मुक्कामी आहेत. आज सकाळीच सदाभाऊ खोत यांनी दिवसाची सुरुवात योगासनाने केली. यावेळी त्यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांनीही योगासने केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
- राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?- पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

