🕒 1 min read
मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची भवानी देवी पदक पटकावण्यात अपयशी ठरली. मात्र तलवारबाजीत ऑलिम्पिकमध्ये भारताकडून जाणारी पहिली खेळाडू म्हणून तिने इतिहास रचला आहे. या पराभवानंतर भवानी देवीने सोशल मीडीयाच्या द्वारे देशवासीयांनी माफी मागितली होती.
भवानी देवीच्या या माफीच्या ट्विटला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदीनी भवानी देवीच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना लिहीले आहे की, ‘ऑलिम्पिक स्पर्धेत तु तुझं सर्वोत्तम दिले आणि हेच कायम लक्षात राहणार आहे. विजय आणि पराभव हा तर आयुष्याचा एक भागच आहे. तुझ्या योगदानाचा संपुर्ण देशाला अभीमान आहे. तु संपुर्ण देशाच्या नागरीकासाठी एक प्रेरणास्थान आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
You gave your best and that is all that counts.
Wins and losses are a part of life.
India is very proud of your contributions. You are an inspiration for our citizens. https://t.co/iGta4a3sbz
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2021
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत झालेल्या पराभवनानंतर भवानी देवीने ट्विट करत संपुर्ण देशवासीयांची माफी मागितली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भवानी देवीने पहिल्या सामन्यात नादिया अझिझिला १५-३ असे पराभूत करत तलवारबाजीत भारतासाठी सामना जिंकणारी पहिली महिला ठरली. मात्र दुसऱ्या सामन्यात भवानी देवीने मनॉन ब्रुनेटकडून तिला ७-१५ असा पराभव स्विकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
- सोनू सूदने केला ढाबा सुरु; पाहायला मिळाला चपाती तयार करताना
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
