Share

श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे भारताने श्रीलंका दौऱ्यात इतर खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या दौऱ्यात प्रामुख्याने खेळाडूंचे दोन गट होते. एक गट होता नवीन युवा खेळाडंचा ज्यांना पदार्पणाची संधी मिळणार होती. तर दुसरा गट होता अपयशी खेळाडूंचा जे वाईट कामगिरीमुळे संघाबाहेर झालेले होते.

यात भारताचा युवा खेळाडू संजु सॅमसनकडे भारतीय संघात स्थान पक्के करण्याची संधी होती. मात्र टी-२० मालिकेत सपशेल अपयशी कामगीरीमुळे त्याच्यासाठी संघाचे दरवाजे कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे. यापुर्वी देखील संजुला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. मात्र तो या संधीचे सोने करु शकला नाही. संजुने आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळताना १३.७५ च्या सरासरीने केवळ ११० धावा करण्यात यश आले.

सद्यस्थितीत भारताकडे यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचा भक्कम पर्याय उपलब्ध आहे. जर तो जखमी झाला तर के एल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळु शकतो. जर हे दोन्ही खेळाडू अपयशी ठरले तर इशान किशनचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या परिस्थीतीत संजु सॅमसनचे संघात पुनरागमन जवळपास अशक्य असल्याने त्याची कारकिर्द संपुष्टात आली असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!