🕒 1 min read
मुंबई:- पुढील दोन वर्षात मुंबई महापालिका निवडणूक होत असून आम्ही ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच या निवडणुकीत भाजप आणि आम्ही एकत्रच राहू. मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल. पण काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय. तसंच आम्ही जिंकलो तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
पुढील विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आमचा मार्ग साफ आहे. उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं? असा मिश्किल सवाल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी विचारला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पुढील 5 वर्षे नाही तर 25 वर्षे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना जे कायद्यात नको आहे ते त्यांनी सांगावं, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचंही आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- स्पर्धापरीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एसबीआयने’ सुरु केली बेस्ट डिस्काउंट ऑफर
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर खबरदार, आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही – फडणवीस
- जयंतराव लाळघोटेपणाची हद्दचं झाली; भाजपची टीका
- रिटायर्ड अधिकाऱ्याच्या खात्यातून तब्बल 40 लाख रुपयांची चोरी; थेट मोदींना पत्र लिहून केली तक्रार
- इंधन दरवाढीच्या तोंडावर इंडियन ऑईल कंपनीने ग्राहकांसाठी आणली खास ऑफर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
