🕒 1 min read
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिमटा काढला. भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही. तिथे मनमोकळेपणाने बोलता येत नाही. देशातही तिच परिस्थिती करून ठेवली आहे. पण भाजपमध्ये अजिबात बोलता येत नाही. पण तरीही चंद्रकात पाटील यांचं मी अभिनंदन करतो.
ते भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल कोल्हापुरचं पाणी दाखवलं. त्यांचा कोल्हापूरशी फार संबंध नसला पुण्यात आले असले तरी थोडं त्यांनी कोल्हापूरचं पाणी दाखवलं. जे पोटात मळमळत होतं. ते ओठावर आलं. नंतर त्यांना खुलासा करावा लागला. ही भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, अशी सारवासारव केली गेली. ही भाजपची भावना आहे तर त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Deepali Sayed : “मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती आणि अमित म्हणजे…”; दीपाली सय्यद यांचा हल्लाबोल
- National Awards 2022 | राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’ नाही; वाचा विवेक अग्निहोत्री काय म्हणाले
- Shivsena : चंद्रकांत पाटील किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत, तेही पाहूयात; शिवसेनेने उडवली खिल्ली
- Devendra Fadnavis | “राऊतांविषयी कशाला विचारता, सेन्सिबल माणसाबद्दल विचारा”; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
- Raj Thackeray : उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, ते बोलतात एक आणि करतात दुसरेच; राज ठाकरेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
