Share

‘विराट जितका मैदानात आक्रमक आहे तितकाच…’

Published On: 

मुंबई : भारतीय  संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानात विराट नेहमीच आक्रमक दिसतो. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला विराट कोहली मैदानात खूपच आक्रमक असायचा. पण काही काळानंतर त्याचा त्याचा आक्रमकपणा कमी झालेला दिसत आहे. पण मैदानाबाहेर विराट खूपच शांत असल्याची माहिती बॉलीवूड अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माने दिली आहे.

आपल्या फलंदाजीने करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या विराटने आपल्या आयुष्यात आणि स्वभावात झालेल्या बदलाचं पूर्ण श्रेय पत्नी अनुष्का शर्माला देतो. विराटने अनेकदा ही गोष्ट बोलूनही दाखवली आहे. अलीकडेच विराट-अनुष्का पहिलांदा आई-बाबाही झाले आहेत. एका मुलाखतीत अनुष्कानं म्हटलं होतं की, विराट मैदानावर जितका आक्रमक आहे, तितकाच तो मैदानाबाहेर शांत आहे.

2019 सालच्या फिल्मफेअर कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना अनुष्काने पती विराट कोहलीविषयी अनेक बाबी उघडपणे सांगितल्या होत्या. विराट कोहली त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण अनुष्काला असा विश्वास आहे की, तो केवळ मैदानावरच आक्रमक असतो. कारण विराटचं क्रिकेटवर खूपचं जास्त प्रेम आहे. अनुष्काने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मैदानाबाहेर विराट खूपच शांत असतो. आपण हे माझ्या मित्रांना आणि टीमला विचारू शकता. मी अनकेदा विराटला म्हणते असते, ‘यु आर सो चिल.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!