Share

माणूस एकदम भला आहे, पण कधीच खरं बोलत नाही; भातखळकरांचा राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचाच बोलबाला आहे. क्रुझ पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने कारवाई करत अटक केल्यापासून नवाब मलिकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर आर्यनला जामीन मिळाला आणि मलिकांनी या ड्रग्ज प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यावरुन आता भाजप चांगलीच आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.

बाळासाहेब असो किंवा उद्धव ठाकरे, किंवा मग शरद पवार आमच्या नेत्यांनी आम्हाला राजकारणाची पातळी ओलांडायची नाही, हे शिकवलं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.

माणूस एकदम भला आहे, प्रॉब्लेम एकच… कधीच खरं बोलत नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. दरम्यान, संजय राऊत, नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस, ड्रग्ज या सर्व प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!