मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला साद घातली आहे. ‘केंद्र सरकारच्या कृषी सुधार कायद्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा द्यायला हवा होता,’ असं ते म्हणाले आहेत. पवार साहेबसुद्धा नरेंद्र मोदींच्या मताचे आहेत. जागतिक बाजारपेठेसह शेतकऱ्यांना सर्वच ठिकाणी बाजारभाव कसा चांगला मिळू शकेल आणि कुठेही त्यांना आपला माल विकता आला पाहिजे.’ असं ते म्हणाले.
यासोबतच, ‘हा कायदा शेतकरी हिताचा असून जाणीवपूर्वक राजकारण खेळलं जात आहे’ अशी टीका देखील रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांवर केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी, ‘ ‘नवीन शेतकरी कायद्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी उडी घेतली आहे. यूपीएच्या राजवटीत त्यांनी शेती क्षेत्रातील सुधारणांसाठी मोदी सरकार आज जे करत आहेत तेच केले.’
‘विरोधी पक्ष निवडणुकांमध्ये पराभूत होत असल्यानेच अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात सहभागी होत आहेत. ते मोदी सरकारला विरोध करायचा म्हणून फक्त विरोध करत आहेत. स्वतःचे भूतकाळातील काम ते विसरले आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने एपीएमसी कायदा रद्द करण्याचा आणि निर्यातीसह शेती उत्पादनांचा व्यापार सर्व निर्बंधांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते’ असं सांगत त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भारताच्या अंतर्गत मुद्यावर पाकिस्तानने खुपसलं नाक; शेतकरी आंदोलनावरून पाकिस्तानी मंत्र्याची मोदी सरकारवर टीका !
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला


