नवी दिल्ली: केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना अनेक स्तरांमधून पाठिंबा मिळताना दिसत आहे. तसेच हा मुद्दा जागतिक स्तरावर देखील पाठींबा मिळवत आहे. या भारताच्या अंतर्गत मुद्यावर पाकिस्तानने नाक खुपसलं आहे.
भारताचा अंतर्गत विषय असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर आता पाकिस्तानने देखील आपलं नाक खुपसलं आहे. पाकिस्तानच्या एका मंत्र्याने या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं असून भारतीय शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. “गुजराती हिंदुत्व ही प्रेरणा असलेल्या भाजपा सरकारला पंजाबी शेतकऱ्यांची काळजी नाही”, अशा शब्दांत इम्रान खान सरकारमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या चौधरी फवाद हुसैन यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
12th day of protests and Delhi is not even listening,seems Gujrati Hinduvata inspired BJP Government has no care for Punjabi farmers, shameful anti Punjab policies of Indian Govt are heartless, my heart goes for my punjabi farmer brothers on the other side of border.. https://t.co/SiDV0nVlro
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) December 7, 2020
Injustice anywhere is a threat to justice everywhere. We must speak up against injustice done to Punjabi farmers Modi policies are a threat to whole region. #FarmersProtest https://t.co/eemAteJMuv
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) December 7, 2020
हुसैन म्हणाले, “शेतकरी आंदोलनाचा आज १२ वा दिवस आहे आणि तरीही दिल्ली अजून त्यांचं ऐकण्याच्या तयारीत नाही. भावनाशून्य मोदी सरकारचे शेतकऱ्यांचे लक्ष नाही. गुजराती हिंदुत्व ही प्रेरणा असलेल्या भाजपा सरकारला पंजाबी शेतकऱ्यांची काळजी नाही. पंजाबी नागरिकांविरोधातील भारतीय सरकारची धोरणं लाजीरवाणी आहेत. सीमेपलिकडील माझ्या पंजाबी शेतकरी बांधवांसाठी माझं हृदय तुटत आहे.” पाकिस्तानी नागरिकांनी पंजाबी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा असं आवाहनही पाकिस्तानी मंत्री हुसैन यांनी केलं आहे. दुसऱ्या एका ट्विटमधून ते म्हणाले, “कुठेही अन्याय होणं म्हणजे सगळीकडे न्यायाला धोका असणं होय. पंजाबी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर आपल्याला बोलायला हवं. मोदी सरकारची धोरणं ही या संपूर्ण पंजाब प्रांतासाठी धोकादायक आहेत.” मोदींच्या अत्याचाराला कोणी विरोध केला तर त्याला पाकिस्तानी एजंट ठरवलं जातं, असा आरोपही हुसैन यांनी आपल्या ट्विटवर आलेल्या एका कमेंटला प्रतिक्रिया देताना केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा’
- काही पक्षांना राजकीय स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय; मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला!
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- …म्हणूनच विरोधी पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात उडी घेत आहेत : रविशंकर प्रसाद
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

