Share

लॉकडाऊनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम, उद्योग संस्थांची भीती

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन सुरू केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात नक्कीच यश मिळणार आहे. पण त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल, अशी भीती भारतीय उद्योगांनी व्यक्त केली आहे. बुधवारपासून राज्यात १५ दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे.
राज्यात लॉकडाऊन होऊ नये, यासाठी उद्योग राज्य सरकारवर दबाव आणले होते. उद्योग मंडळाच्या एफआयसीसीआयने राज्य सरकारशी चर्चा केल्याचे सांगितले

यावेळी संघटनेने आपल्या सदस्यांकडून मिळालेल्या सूचना राज्य सरकार बरोबर सामायिक केल्या. लॉकडाऊनमुळे राज्यात कोरोना संक्रमणाची गती कमी होईल; परंतु लॉकडाऊनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सखोल परिणाम होईल. आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी आणि अंमलबजावणीचे प्रश्न सोडवण्यासाठी फिक्की महाराष्ट्र या प्रकरणात राज्य सरकारबरोबर संपूर्णपणे काम करेल असे फिकी संघटनेने सांगितले.

तर दुसरीकडे उद्योग संघटना ॲसोचॅमनेही सांगितले की, उद्योगांना, विशेषत: अशा अनौपचारिक क्षेत्रातील उद्योजकांना अशा वेळी सर्वाधिक त्रास होतो. तो होऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी. भारतीय उद्योग परिसंघनाच्या म्हणजेच सीआयआयने सांगितले की, कामगार आणि उद्योगांची कामाची ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. यासह साथीच्या रोगाचा प्रसार थांबवण्यावरही उद्योग लक्ष केंद्रित करीत आहे. सुरुवातीपासूनच सीआयआयचा विश्वास आहे की, उद्योग चालूच राहिले पाहिजेत. तथापि, कामाच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी मानक प्रक्रिया पाळल्या पाहिजेत. लॉकडाऊन लागू नये, असे सीआयआयचा आग्रह होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!