Share

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मुद्दा गेला थेट संसदेत

Published On: 

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझे प्रकरणात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामो़डी समोर येत आहे. यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीन्याम्याची मागणी विरोधकांनी जोर धरून ठेवली आहे. याबाबतचे पडसाद आज संसदेतही दिसून आले. खासदार गिरीश बापट, खासदार नवनीत राणा आणि खासदार पुनम महाजन यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत निलंबित केलेल्या सचिन वाझेंची पुनर्नियुक्ती का केली? असा सवाल उपस्थित केला. तर पूनम महाजन या प्रकरणी म्हणाल्या की, परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. तर शिवसेनेला का मिरच्या झोंबत आहेत ?

‘पोलीस अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांकडूनच खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाहावे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.

मात्र यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीची बाजू लावून धरत महाराष्ट्रात भाजप सरकार आणण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू असल्याची टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!