इंग्लंड : भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत समालोचन पॅनेलचा भाग आहे. दरम्यान, कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्याने म्हटले आहे की, ट्रेंट ब्रिज कसोटीनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताची धार भारी आहे. कार्तिकच्या मते, ट्रेंट ब्रिजवर खेळलेली पहिली कसोटी निःसंशयपणे अनिर्णित राहिली, पण भारतीय संघासमोर यजमानांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले.
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा वरचष्मा होता. इंग्लंडच्या तुलनेत या कसोटी सामन्यात भारताला बरेच काही शिकायला मिळाले. पाहुण्या संघाने संपूर्ण कसोटीत चमकदार कामगिरी केली. जसे, बुमराहने खेळाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच षटकात रोरी बर्न्सला बाद केले, ते शानदार होते. भारतीय गोलंदाजांनी तिथे आपला हेतू स्पष्ट केला. फलंदाजांनीही चांगला खेळ केला. ” मात्र, सामना निष्कर्षापर्यंत पोहोचला नाही.
दुसरीकडे, सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला, “आम्ही सामना जिंकण्याच्या अगदी जवळ होतो. आमचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाले.” त्याचवेळी इंग्लंडचा कर्णधार जो रूट सामन्यानंतर म्हणाला, “आम्ही येथून लॉर्ड्सला जात आहोत, संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली ते पाहून बरे वाटले. संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.” मात्र, जर पाहिले तर फक्त इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला आणि बाकीचे इंग्लिश खेळाडू फारसे काही करू शकले नाहीत.
दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तोपर्यंत पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांनी क्वारंटाईन पूर्ण केले असेल पण ते दुसऱ्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध नसतील कारण त्यांना लाल बॉलने सराव करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार
- पुण्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याची होतेय मागणी
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवली,अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल


