जुन्नर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर देखील ३० जुलै २०१४ च्या रात्री मोठं संकट कोसळले होतं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर १५१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आणि आत तीच परीस्थिती महाड मधील तळीये या गावावर ओढवली आहे. महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अद्यापही शोधकार्य सुरु असून काही नागरिक बेपत्ता आहेत.
याच पार्श्वभूमीवर माळीण वासियांनी मुख्यमंत्री साह्याता निधीला 25 हजारांची मदत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे सुपुर्द केली आहे. लहानग्यांसह कुटुंबातील कर्ते व्यक्ती या दुदैवी घटनेत गेले तेव्हा पासुन आजपर्यत या वेदना माळीणवासि भोगत आहेत, आपण जे भोगलं ते कोणाच्याच वाट्याला येऊ नयेत तसेच सात वर्षापुर्वी अनेक मदतीचे हात माळीण वासियांकडे वळाले होते आता आमचीही काही जबाबदारी आहे अशी भावना मनात ठेवुन दरड कोसळुन अनेकांचे संसार उघड्यावर आलेत त्यांच्या मदतीसाठी माळीण मधील ग्रामस्थांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे 25 हजारांचा रुपयांचा धनादेश दिला आहे.
राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील तळीये गावाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. माळीणच्या नागरिकांनी तळीये गावावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावर आपल्या भावना व्यक्त करताना ‘आम्ही तुमचं दुःख जाणतो’ म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण: युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

