कल्याण – दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाउननंतर पुन्हा कडक लॉकडाउन लागण्याच्या भीतीने शहरातील दुकानांसह उपनगरांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडताना पाहायला मिळत आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने डीमार्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचे दिसून येत आहे
गुढीपाडवा आणि लॉकडउनच्या शक्यतेने नागरिकांनी सकाळपासून किराणा दुकाने, भाजी व फळांचे विक्रेते, मिठाईची दुकाने, बँक, पेट्रोल पंप, दुग्धालय येथे गर्दी केली होती. कल्याण परिसरातील नागरिकांनी वीकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला होता; पण आज सकाळपासूनच नागरिकांनी भाजीपाल्यासह किराणा घेण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या मात्र डी मार्ट बंद असल्याने एक तरुणी भलतीच संतापल्याचे दिसून आले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना या तरुणीने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.‘किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय? असं नाही की उद्धव काका घरी किराणा पाठवणार?’ असा थेट सवाल उपस्थित करत या तरुणीने आपला राग थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच काढला.
आपला संताप व्यक्त करताना ही तरुणी म्हणाली,’दोन-तीन दिवस झाले, आम्ही नंबर घेतोय, कॉल करतोय, नंबर मिळत नाहीये. इथे आलो, रांग लावली. कूपन मिळत नाहीये. मग किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय? ठीक आहे लॉकडाऊन आहे, आम्ही घरी बसतो, घरात बसून पाणी तर पिणार नाही ना? खायला लागेल’.
‘किराणा दुकान बंद, डी मार्ट बंद, मग जायचं कुठे? असं नाही की उद्धव काका घरी पाठवणार आहेत किराणा? नाहीतर घरपोच सेवा करा, आम्ही खाऊ घरी. गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांना किराणा नाहीये घरी. मग करायचं काय?’ असा सवाल तरुणीने विचारला.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे प्रकरणात नवा ट्वीस्ट, चौकशी करणाऱ्या NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- बोगस डॉक्टरने सुरु केले होते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

