Share

उतावीळ नवरदेवाकडून खंडणी वसुल करणारी टोळी गजाआड

Published On: 

बीड: वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून ही टोळी आमच्याकडे मुलगी आहे असे सांगून स्थळ दाखवते व लग्नासाठी पैशाची मागणी करुन वारंवार खंडणी वसूल करत. महाराष्ट्रातील काही मोठ्या शहरातील विवाह इच्छुक व्यक्तींना फसवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोन जणांना आष्टी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. या घटनेने आष्टीसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका २७ वर्षीय तरुणासोबत लातूर येथील सोनाली गणेश काळे यांचा मंगळवारी आष्टी येथील गणपती मंदिरात विवाह संपन्न झाला. परंतु लग्नाच्या दिवशी रात्री सदरील महिलेने आपल्या पतीला २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून माझ्यावर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्यानंतर पतीच्या पायाखालील जमीन सरकली.

सदरील तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने आष्टी पोलिसांना ही माहिती दिली. आष्टी पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करणाऱ्या अजय महारुद्र चवळे व सोनाली गणेश काळे यांना पन्नास हजाराची खंडणी घेताना आष्टी येथे शनिवारी त्या टोळीला रंगे हात पकडण्यात यश आले. प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!