मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. आता सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला गेला आहे. उच्च न्यायालयाकडे जाईपर्यंत आपल्याला संरक्षण मिळावे अशी सोमय्यांच्या वकिलांनी मागणी केली, पण न्यायालयाने संरक्षण देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असणार आहे.
आता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “किरीट सोमय्या कुठे आहे ? सोमय्या कुठे पळून गेलेत ? आता ‘भाग सोमय्या भाग’ असा चित्रपट काढायला हवा. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. खोटी कागदपत्रे तयार केली जात आहेत. सोमय्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता पोलिसांनी सोमय्यांना अटक करावं.
सोमय्यानी आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला निधी पक्षाला दिला अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भाजपला सहआरोपी करायचं का ? असा मुद्दा ही संजय राऊत यांनी मांडला.
महत्वाच्या बातम्या :


