Share

‘वाराणसीचा विकास भगवान काशीविश्वेश्वराच्या आशीर्वादानं आणि इथल्या जनतेच्या इच्छाशक्तीमुळेच झाला’

Published On: 

🕒 1 min read

वाराणसी – गेले वर्ष-दीड वर्ष आपण, किंबहुना संपूर्ण मानवजात कोरोना नावाच्या महाभयंकर आपत्तीचा सामना करीत आहे. पण अशा कठीण काळातही आपण थांबत नाही, थकत नाही, हे काशीनं, इथल्या जनतेनं दाखवून दिलं आहे. वाराणसीचा विकास आणि कायापालट भगवान काशीविश्वेश्वराच्या आशीर्वादानं आणि इथल्या जनतेच्या इच्छाशक्तीमुळेच झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

वाराणसी इथं 1 हजार पाचशे 83 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी आज काही वेळापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. त्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी माता आणि बालकांच्या सुविधेसाठी 100 खाटांच्या विभागाचं, गोदौलिया इथल्या भव्य वाहनतळाचं तसंच पर्यटन विकासासाठी गंगा नदीसाठी रो-रो जहाजाचं आणि वाराणसी-गाजीपूर महामार्गावरच्या 3 पदरी उड्डाणपूलांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

आठशे 39 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आणि सार्वजनिक कामांचा शिलान्यासही मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या एकशे 43 ग्रामीण प्रकल्पांचा यात समावेश आहे. जपानच्या मदतीनं बांधण्यात आलेल्या रुद्राक्ष, या आंतरराष्ट्रीय सहकार आणि अधिवेशन केंद्राचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!