Share

टीम इंडियाच्या सुरक्षिततेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या श्रीलंका आणि इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कार्यक्रमात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यानंतर आगामी मालिकेसंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मालिका पुढे ढकलण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला होता.

श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेच्या खेळाडूंचे हॉटेल बदलण्याची विनंती केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही विनंती मान्य केली आहे. या निर्णयानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या क्रिकेट संघाला भारतीय खेळाडू राहत असलेल्या हॉटेलपेक्षा दिड किलोमीटर दुर असलेल्या हॉटेलमध्ये हलवले आहे. कोरोनाचा शिरकाव भारतीय संघात होऊ नये म्हणून बीसीसीआयने ही विनंती केली होती.

यादरम्यान भारताविरुद्धच्या मालिकेच्या वेळापत्रकातही थोडासा बदल करण्यात आला आहे. भारताविरुद्धची मालिका १३ जुलै ऐवजी १७ जुलैला सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने आता १७, १९ आणि २१ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे. तर टी-२० मालिका २१ जुलैच्या ऐवजी २४ जुलैपासुन सुरु होणार आहे. या मालिकेतील सामने २४, २५ आणि २७ जुलै दरम्यान होणार आहे. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप भारताविरुद्धच्या संघाच्या कर्णधारपदाची घोषणा केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!