Share

उस्मानाबादेत तब्बल १५ दिवसांनंतर घटली कोराेना मृत्यूची संख्या

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे मृत्यू पावण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर असताना मंगळवारी अचानक हे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात चिंता कमी झाली. जिल्ह्यात मंगळवारच्या अहवालानुसार ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, गेल्या १२ तारखेपासून दररोजची ही संख्या १० पेक्षा अधिक होती.दरम्यान,मंगळवारी जिल्ह्यात ७२८ नवे रूग्ण आढळले असून, ६३४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

अपुऱ्या सुविधा, कमी मनुष्यबळ,साधनसामग्रीची कमतरता, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत उपलब्ध यंत्रणा प्रयत्न करत आहे. मात्र, तुलनेने दररोज आढळणारे नवे रूग्ण आणि उपलब्ध यंत्रणा,यामध्ये मोठा फरक असल्याने रूग्ण गंभीर अवस्थेत जाऊन मृत्यू पावत आहेत. बहुतांश रुग्ण गंभीर स्थितीतच रूग्णालयात पोहोचत आहेत. कोरोनाने १२ एप्रिलला ५ जणांचा मृत्यू झाला. १३ तारखेला ७ जण दगावले, मात्र नंतर हे प्रमाण अत्यंत चिंताजनक पध्दतीने वाढत गेले.

दररोज किमान १० रूग्णांचा काेरोनाने बळी घेतला.१२ तारखेनंतर मंगळवारी प्रथमच हे प्रमाण कमी होऊन पाचवर आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोेराेनाने ८७४ जण मृत्यू पावले आहेत. अजूनही कोरेानाचा आलेख वाढतच आहे. मंगळवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ७२८ नवे रूग्ण आढळले असून, ही संख्या उस्मानाबाद शहरासह तालुक्यात सर्वाधिक २५४ आहे.त्यापाठोपाठ कळंब तालुक्यात ९३, उमरगा ९०, तुळजापूर ७१, भूम ६८,लोहारा ६६,वाशी ४६ व परंडा तालुक्यात ४० रूग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!