🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला. राज्यातील मृत्यूदरही इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहे. या कोरोना काळात झालेले सर्व मृत्यू म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी थंड डोक्याने केलेली हत्या असल्याची टिका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यात ऑक्सिजन आणि इतर आरोग्य सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. नाशिकमध्येही ऑक्सिजनची गळती झाल्याने आज २२ रुग्णांना जीव गमवावा लागला. या सर्व मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
Every death today due to COVID is actually cold-blooded murder by Centre and State governments who ignored our medical infrastructure all these years. Now whatever you are doing is too little too late.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) April 21, 2021
या संदर्भात खासदार जलील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोरोनामुळे आज होणारा प्रत्येक मृत्यू हा केंद्र आणि राज्य सरकारकडून होणारी हत्या आहे. इतके वर्ष आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. आता आपण जे करत आहात, त्याला खुप उशीर झालेला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
