Share

“महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरच दूर व्हावा” ; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

नागपूर :  आज नागपूर मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य दाखल झाले आहे. नागपूरमध्ये राणा दाम्पत्य यांच्या हस्ते मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नागपूरच्या मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आमची विमानतळावर अडवणूक करण्यात आली, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. “३६ दिवसांनंतर आम्ही नागपूरमध्ये येतोय, दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी का ठेवली आहे? आम्हाला आतमध्ये बराच वेळ थांबवून ठेवण्यात आलं, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का केला जात आहे? मुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन”, अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हनुमान चालीसा पठण हा सगळा दिखावा आहे अशी टीका तुमच्यावर होते, या प्रश्नावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “आम्ही दिखाव्यासाठी करतो, मुख्यमंत्री दिखाव्यासाठीही करत नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठीच का होईना, एकदा हनुमान चालीसा वाचावी” असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!