Share

‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगाल जिंकण्याच्या अट्टहासापायी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने देशाला उद्ध्वस्त केले, असा घणाघात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बंगालची निवडणूक जिंकण्यात अपयश आल्यामुळेच भाजपने राज्यात हिंसाचार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केली.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी शनिवारी बिमान बंडोपाध्याय यांची निवड करण्यात आली. ते तिसऱ्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत. यावेळी बोलताना ममतांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाजपला जनादेश मान्य नाही. निवडणूक जिंकण्यात अपयश आल्यामुळेच ते बनावट व्हिडीओ आणि संदेश पसरवून हिंसाचार भडकवत आहेत, असा आरोप ममतांनी केला. संसदेची नवी इमारत, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान आणि पुतळ्यांवर ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याऐवजी कोरोना लसीकरणाला सरकारचे प्राधान्य हवे, असे ममता म्हणाल्या.

देशात कोरोनाचे संकट गंभीर असतानादेखील गेले सहा महिने केंद्र सरकारने काहीच काम केले नाही. भाजप केवळ बंगाल जिंकण्याच्या उद्देशाने पेटून उठला होता. बंगाल ताब्यात घेण्यासाठी मोदींसह त्यांचे मंत्री गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात तळ ठोकून होते. बंगालच्या जिंकण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळेच आज देश उद्ध्वस्त झाला आहे, असे ममता म्हणाल्या. निवडणुकीच्या काळात राज्यात तैनात निमलष्करी दलांची कोरोना चाचणी झाली नव्हती आणि त्यांच्यामुळेच बंगालमध्ये कोरोना संसर्ग वाढला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!