टीम महाराष्ट्र देशा : हिमाचल प्रदेश मधल्या मनाली ते लडाख या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या ‘रोहंताग अटल बोगदा’ या बोगद्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.हा बोगदा एकूण ९.२ किलोमीटर लांबीचा आहे.या बोगद्याचे भूमिपूजन काँग्रेसच्या काळात झाले होते.पण नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.
या बोगद्याचे भूमिपूजन केंद्रात यु.पी.ए. अर्थात काँग्रेसचे सरकार असताना झाले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला होता. त्याची कोनशिला बोगद्यावर लावण्यात आली होती. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनावेळी पायाभरणीची कोनशिला नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. या प्रकरणी काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. भाजपने हे जाणीवपूर्वक केले असून, पायाभरणीची कोनशिला लावेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) या बोगद्याची उभारणी केली आहे. हा बोगदा पूर्ण होण्यास जवळपास दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. या बोगद्यामुळे मनाली ते केलॉंग हे अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले आहे. बोगद्याची रुंदी १०.५ मीटर असून, ८० किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावणार आहेत. प्रत्येक १५० मीटर अंतरावर बोगद्यात आपत्कालिन टेलिफोन यंत्रणा आहे. याचबरोबर प्रत्येक २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या बोगद्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, जयराम ठाकूर, अनुराग ठाकूर, जनरल बिपिन रावत, एम.एम.नरवणे, बीआरओचे महासंचालक लेप्टनंट जनरल हरपाल सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
- ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही, सरकारवर उघड नाराजी
- राज्यपाल कोश्यारी यांना ‘सेक्युलर’ तत्त्वाचा विसर पडला आहे : राष्ट्रवादी
- विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी काँग्रेसकडून सत्यजित तांबेंच नावं चर्चेत!
- ‘छोटे नवाब’ तैमूरचा मनोरंजक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- बिहारमध्ये आरजेडीने सरकार बनवले तर बिहार बनेल दहशतवाद्यांचा अड्डा : केंद्रीय गृहराज्यमंत्री


