मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निकालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, विधानपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालं आहे. मी मित्रपक्षांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो.नागपूरचा जो मतदारसंघ गेली ५५ वर्ष कधीही काँग्रेसला मिळाला नव्हता, जो भाजप – संघाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाला.
थोरात म्हणाले, मित्रपक्षांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच हा आणि इतर विजय आम्ही संपादित कर शकलो. पुढील काळातही महाविकास आघाडी यश मिळवत राहील. कारण या निकालातून खूप मोठे आशीर्वाद जनतेने आम्हाला दिल्याचे मी मानतो. शेतकरी, कामगार हे तर पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेले आहेत.
थोरात म्हणाले,दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनातून भाजप सरकार विरुद्धचा शेतकरी, कामगारांचा असंतोष बाहेर पडतो आहे.आता सुशिक्षित मतदारही आमच्या मागे ठामपणे उभा राहिलाय. याचा अर्थ असा की भाजपची विचारसरणी आणि कार्यपद्धती त्यांनीही पूर्णपणे नाकारली आहे. काँग्रेसच्या विचाराने हा देश पुन्हा आपल्याला बळकट बनवायचा आहे आणि विधानपरिषदेचा हा निकाल ही त्याचीच सुरवात आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- ‘हा विजय महाविकास आघाडीतील सर्वांच्या संघटीत व सुनियोजित प्रयत्नांचा परिणाम आहे’
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’


