मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.खासदार अमोल कोल्हे यांनी या निकालावर भाष्य केले आहे. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन देखील केले आहे.
कोल्हे आपल्या सोशल मिडीयावरील पोस्ट मध्ये म्हणतात, विजयासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. याबद्दल त्यांचे आभार. यासोबतच आदरणीय शरद पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, बाळासाहेब थोरात जी या सर्वांनी देखील अहोरात्र कष्ट घेतले. हा विजय महाविकास आघाडीतील सर्वांच्या संघटीत व सुनियोजित प्रयत्नांचा परिणाम आहे. या यशाबद्दल या सर्वांचेही हार्दिक अभिनंदन.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

