Share

मुख्यमंत्र्याचे जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नाही?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने ‘ब्रेक द चेन’च्या नव्या नियमावलीनुसार अनेक घडामोडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारापेठाही बंद आहेत. मात्र, असे असतानाही रुग्ण संख्येत म्हणावी तशी घट झालेली नाही. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची शिफारस केली होती. तसा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोणतीच नवी नियमावली जाहीर केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नसल्याचे प्रतिक्रीया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

या संदर्भात भातखळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करतील असे काल मंत्र्यांनी मीडिया समोर सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांना आज जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नाहीसे दिसते.’

कोरोना रुग्णांना उपचार देण्यात, राज्यातील आरोग्य यंत्रणा सांभाळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. तसे राज्यांनाच अधिकार असल्याचे मोदी म्हणाले होते. मात्र, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत कोणतेही भाष्य केले नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!