बीड : ठेवीदारांना तब्बल २६ कोटीचा चुना लावणारा मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे मंगळवारी येथील न्यायालयात स्वतः शरण आला. अलझेंडेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले होते. शेवटी त्यानेच न्यायालयात शरण घेतले आहे.
येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे याने शेकडो ठेवीदारांचे २६ कोटी रुपये गिळकृत करून मागील तीन वर्षांपासून फरार होता. त्यांनी मल्टीस्टेटच्या १३ शाखा सुरू केल्या होत्या, तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे ठेवी ठेवल्या होत्या. या ठिकाणी मोठा घोळ केल्याने मागील तीन वर्षांपासून चेअरमन अलझेंडे फरार होता.
परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा घोळ झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले तर अनेकांच्या मुला- मुलींचे लग्न मोडले. विजय उर्फ भारत अलझेंडे हा न्यायालयाला शरण आल्याने या ठिकाणच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येणाऱ्या काळात त्यांना त्यांची ठेवलेली रक्कम मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागतील – इक्बाल चहल…
- ‘ये तो बिल्कुल नही बदला यार’ ; सचिन-युवराजची विकेट घेतल्यानंतर माँटी पानेसर सोशलवर चर्चेत
- आरक्षण द्या अन्यथा रस्त्यावर उतरु: साष्टपिंपळगावातील तरुणांचा यल्गार
- स्मारकाच्या पैशातून रुग्णालये उभारा, त्यांना बाळासाहेबांचे नाव द्या : खा. इम्तियाज जलील
- ‘रात्रीस खेळ चाले’ नंतर ‘या’ मालिकेचा येऊ शकतो सिक्वल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

