औरंगाबाद : केंद्र सरकारने नुकतेच देशाचे बजेट जाहीर केले. या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळाले नाही अशी ओरड विरोधी पक्षांकडून होत आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा पाढाच वाचून दाखवला. आपापल्या मतदारसंघात भाजप खासदारांनी बजेटबद्दल माहिती देण्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्या अनुषंगाने जालन्याचे खासदार दानवेंनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पातील मुद्दे स्पष्ट केले.
ते म्हणाले, अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तावेज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांचा विचार करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया देखील समाविष्ट करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात भरपूर तरतूद करण्यात आली आहे. विरोधक काहीही म्हणत असलेलं तरी पुणे, नाशिक, मुंबई मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली आहे. ३५ हजार कोटी रुपयांची कोरोना लसीसाठी तरतूद आहे. १० हजार किलोमीटर लांबीचे ३२८ रस्ते करण्यात येणार आहे, अशा अनेक योजनांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्राच्या तरतुदीतून राज्य सरकारने विलंब न करता कामे केली तर यापेक्षा अधिक निधी केंद्राकडून देण्यात येईल असे दानवे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- जावई हर्षवर्धनच्या प्रश्नावर भडकले रावसाहेब दानवे, म्हणाले…
- फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘उद्धव ठाकरेंना पूजा चव्हाण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणालाही पाठीशी घालणार नाहीत; संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- उद्यापासून महाविद्यालये सुरु ; पुण्यात अभाविप करणार ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

