Share

‘गंगेतील मृतदेहांची चर्चा झाली, पण बीडच्या २२ मृतदेहांच्या विटंबनेवर शांत का?’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात उत्तर प्रदेशात गंगेतून वाहून गेलेल्या ५० मृतदेहांची चर्चा झाली. पण बीडमध्ये एका व्हॅनमध्ये कोंबून भरलेल्या २२ मृतदेहांची चर्चा झाली नाही, असे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात प्रचार करण्यासंदर्भातील एक यंत्रणा उभारण्यात आलीये. त्या माध्यमातून काम होत असल्याची टीका करताना फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि बीडमधील घटनेची तुलना केली.

महाराष्ट्र सरकार रोज सकाळी एखादी खोटी किंवा दिशाभूल करणारी बातमी सोडून ती इकोसिस्टीमच्या माध्यमातून वाजवते असा आरोप फडणवीस यांनी केलाय. समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमे भाजपावर हवी तेवढी टीका करु शकतात, त्यासंदर्भात कुठलीच अडचण नाहीय. मात्र शिवसेनेच्याविरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्याविरुद्ध किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एक जरी पोस्ट टाकली तरी नोटीस देण्यात येते. आमच्या १० हजार कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नोटीस देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

काय घडले बीडमध्ये?
एप्रिल महिन्याच्या शेवटी बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!