मुंबई : भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
लंडनमध्ये पोहचताच लोकेश राहुलने ट्विट करून लंडनमध्ये सुरक्षित पोहोचल्याचे म्हटले आहे. ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय संघाला सक्तीच्या विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. जवळपास तीन दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात त्यांना हॉटेलमध्ये स्वतंत्र राहावे लागणार आहे.
दरम्यान, पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही. असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांची खेळण्याची पद्धत ही वेगळी आहे. पुजारा हा सावध आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो, तर पंत नेहमी आक्रमक पणे खेळताना दिसतो. दोन्ही शैलीतील खेळाडू जेव्हा मिसळून खेळतात, तेव्हाच संघाला यश मिळू शकते, . पुजारा अगदी शिस्तबद्ध आहे. त्याला वेगळे काही तरी करायला आवडत नाही. याऊलट पंत निडर आहे. तो धोका पत्करायला घाबरत नाही. हे दोघे केवळ क्रिकेटच्या मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही असेच आहेत. परंतु, तुम्हाला क्रिकेटचे सामने जिंकण्यासाठी दोघांचीही तितकीच गरज असते, असे राठोड म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर : मोठ्या झुंबरासह पीओपी स्लॅब कोसळला अन् आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

