नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणावर चांगलेच तोंडसुख घेत सरकारची खिल्ली उडवली आहे. हे आर्थिक सर्वेक्षण छापील स्वरूपात प्रसारित करायचे नाही असे जो निर्णय सरकारने घेतला आहे तोच त्यांचा सर्वोत्तम निर्णय म्हणावा लागेल. आपल्या सरकारने दूरदृष्टीने विकासाचे निर्णय घेतले म्हणूनच देशाच्या आर्थिक व्यवस्थेत आता सुधारणा दिसून येऊ लागल्या आहेत, असे स्वतःच नमूद करून सरकारने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे घातपर्व हळूहळू निरोप घेत असताना भारताची अर्थव्यवस्था नेमकी कुठे आहे, याचे चित्र सादर करणारा ‘आर्थिक पाहणी अहवाल’ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेला सादर केला आहे. या अहवालामधून लवकरच सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची काही चाहूल लागते. याच पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम म्हणाले कि "या वेळेच्या सर्वेक्षणाचा हेतू मात्र भलतेच काही तरी भासतो आहे. पण हा नेमका काय हेतू आहे हेही यातून स्पष्ट झालेले नाही. सरकारने शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले पण ते यावेळी छापील स्वरूपात सादर केले गेलेले नाही. त्याची डिजिटल आवृत्ती प्रसारित केली गेली असल्याचे सरकारने म्हटले आहे.
आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी या संबंधात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की देशाच्या एकूण आर्थिक स्थितीची माहिती देशातील नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी देशात एकेकाळी हे आर्थिक सर्वेक्षण छापील स्वरूपात वितरित केले जात असे.
The CEA has rebuked the government for pursuing a tight-fisted fiscal policy.
Who is right – the FM or the CEA?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 29, 2021
महत्वाच्या बातम्या
- खासदारांनी माहिती घेऊन चौकशीनिशी बोलावे-तनवाणी
- पालिका-वक्फ बोर्डाचा वाद चिघळण्याची शक्यता
- साष्टपिंपळगावमधील मराठा समाजाचे उपोषण मागे
- प्रिंट मेकिंग चित्रांचे प्रदर्शन आणि परीसंवाद वेबिनार
- कचर्याचे ढिगारे संपवण्यासाठी दोन्ही कचरा प्रकल्प १६ तास चालणार


