Share

खासदारांनी माहिती घेऊन चौकशीनिशी बोलावे-तनवाणी

Published On: 

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील वक्फ बोर्डच्या जागेवर १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले. यात शहरातील बड्या व्यक्तींची नावे घेतली, परंतु घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करावी त्यानंतर निर्णयाची वाट बघावी, निर्णय झाल्यानंतर थेट आरोप करावे. तसेच खासदारांनी उघड केल्याचा दावा असलेल्या प्रकरणाच्या चौकशीनिशी माहिती घेऊन बोलावे. असे प्रतिउत्तर खा. जलील यांनी जमीन घोटाळ्यात नाव घेतलेले माजी नगरसेवक राजू तनवाणी यांनी दिले.

या प्रकरणाची अर्धवट माहिती खा. इम्तियाज जलील यांना आहे. या प्रकरणाचा करारनामा २०१२ ला झाला असून, २०१८ मध्ये न्यायालयाने स्थगितीसह काम करण्याचे सांगितले. यात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. हे प्रकरण खासदारांना माहीत असतं तर तीन वर्षे ते का शांत बसले असते. आणि कागदपत्रे जर चुकीची असती, तर त्या त्या विभागाने आम्हाला काम करण्यापासून आधीच थांबवले असते.

मुळात त्यांना आमचे मतदान मिळाले नाही, परंतु शहरातून त्यांना चांगली मत पडली आहे. त्यामुळे माहिती न घेता आरोप त्यांनी करू नये. लोकांचे ऐकणे थांबवावे आणि स्वतः कागदपत्रे वाचावी म्हणजे शून्याचा घोळ त्यांच्या कडून होणार नाही असे राजू तनवाणी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!