औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव इथं सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. पूर्ण राज्यातील मराठा समाजाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. यातच २६ जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य आणि मुक्ताबाई ढेपे उपोषणाला बसले होते. या दरम्यान बाबासाहेब वैद्य यांची प्रकृती अचानक बिघडली होती. तरी देखील या आंदोलनाची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली नव्हती. त्यामुळं आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलन स्थळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपोषण मागे घेऊन केवळ आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपोषण सोडण्यात आले. आता साखळी पद्धतीने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेकिंग न्यूज : संजय राऊत आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता
- निवडणूक बिनविरोध करत ‘वृद्धेश्वर’ सहकारी कारखान्यावर पुन्हा राजळेंची सत्ता
- स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसराचे रुपडेच पालटले
- खासदारांनी आकडे मोड नीट करावी – राजू तनवाणी
- उस्मानाबादचे व्यापारी जीएसटी विरोधात आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

