मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने दैदीप्यमान कामगीरी केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताने या स्पर्धेत सर्वात जास्त म्हणजे ७ पदके पटकावली. यात एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या दैदीप्यमान यशानंतर पुन्हा क्रिकेटचा समावेश खेळाच्या या महाकुंभात करण्यात यावा अशी मागणी क्रिकेट प्रेमी करत आहेत. यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना प्रश्न केला असता त्यांनी असे झाल्यास आमचा पुर्ण पाठिंबा असणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले.,’ऑलिम्पिक स्पर्धेत जर क्रिकेटचा समावेश होत असेल तर आमचा पुर्ण पाठिंबा आहे. जर स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला तर भारतीय संघ नक्कीच सहभागी होईल’ असे त्यांनी संगितले.
यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले,’बीसीसीआय आणि आयसीसी दोन्ही संघटनाचे ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट समावेशाबाबत एकमत आहे. जर भारतीय ऑलिम्पिक असोसीएशनने हस्तक्षेप नाही केला तर २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश नक्की होईल.’ असे ते म्हणाले. यापुर्वी १९०० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या ‘त्या’ याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध
- ९ ऑगस्ट ठरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस
- नीरज चोप्राने बायोपिकसाठी दिली ‘या’ दोन अभिनेत्यांना पसंती
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
