मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जोरदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. मात्र जखमी खेळाडूंच्या जागी इंग्लंडला गेलेले पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव संघासोबत गेले नाही. कारण अद्यापही त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आलेला नाही.
इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. परिणामी पहिली कसोटी अनिर्णीत झाली. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीमुळे टीम इंडिया विजयाच्या जवळ पोचली होती. मात्र दुर्दैवाने पावसाचे आगमन झाले आणि सामना अनिर्णीत झाला. यादरम्यान ब्रिटनने भारताला कोरोनाच्या रेड लिस्टमधून काढले आहे. त्यामुळे लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रविवारी ८ ऑगस्ट रोजी ब्रिटनने भारताला रेड लिस्टमधून हटवले आहे. यामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये प्रवास करता येणार असल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली येत्या मंगळवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. यादरम्यान सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचा विलगीकरण कालावधी १३ ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे १४ ऑगस्टपासुन ते सरावाला सुरुवात करतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

